‘नमस्कार, मैं रवीश कुमार’, एव्हाना तुम्हाला अंदाज आलाच असेल की, मी काय सांगणार आहे…
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • छायाचित्रं रवीश कुमार यांच्या आजच्या व्हिडिओ-मनोगतातून...
  • Thu , 01 December 2022
  • पडघम माध्यमनामा रवीश कुमार Ravish Kumar एनडीटीव्ही NDTV गोदी मीडिया Godi media

२९ नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे संस्थापक दाम्पत्य प्रणव व राधिका रॉय यांनी राजीनामा दिला आणि तो देशभर (आणि देशाबाहेरही) बातमीचा आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला. त्या धक्क्यातून एनडीटीव्हीचे आणि सच्च्या पत्रकारितेचे चाहते, पाठीराखे बाहेर येतात न येतात, तोच काल ३० नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनीही राजीनामा दिला. काल दिवसभर त्याविषयी सोशल मीडियावर आणि हजारो पोर्टल्सवर लिहिलं, बोललं गेलं.

रवीश कुमार यांनी काल कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आज सकाळी सकाळी त्यांनी ‘Ravish Kumar Official’ या त्यांच्या यु-ट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २४ मिनिटे आणि १२ सेकंदांच्या या त्यांच्या मनोगतात त्यांनी एनडीटीव्हीमध्ये सलग २७ वर्षं केलेल्या कामाचा, तिथं शिकलेल्या पत्रकारितेच्या नीतीमूल्यांचा आणि मिळालेल्या स्वातंत्र्ययुक्त जबाबदारीचा जसा उल्लेख केला आहे, तसाच आपल्या सहकाऱ्यांचा, विशेषत: महिला सहकाऱ्यांचा, त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या देशभर (आणि जगभरच्याही)च्या पत्रकारांचा आणि इतरांचाही उल्लेख केला आहे. त्यात मराठीचाही समावेश आहे.

रवीश कुमार अस्वस्थ जरूर आहेत, पण आक्रस्ताळे झालेले नाहीत. त्यांच्या बोलण्यात खंत, नाराजी आहे, पण द्वेष, तिरस्कार नाही. अतिशय संयत स्वरात, काहीशा भावूक अवस्थेत ते नेहमीच्या आपल्या हटके व काव्यमय शैलीत, अतिशय सहजसुंदर, ओघवत्या हिंदीत बोलले आहेत. राष्ट्रीय पत्रकारितेत अशी काव्यमय शैली असलेले ते बहुधा एकमेव टीव्ही पत्रकार आहेत. आता खरं तर, ‘होते’ असं म्हणावं लागेल.

रवीश कुमार यांचं हे जवळपास अर्ध्या तासाचं मनोगत आहे. त्याचा सर्वाधिक भाग त्यांनी खर्च केलाय तो त्यांच्या प्रेक्षक-चाहत्यांसाठी... त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. त्यांनी म्हटलंय – “मैंने इस्तीफ़ा दे दिया हैं। यह इस्तीफ़ा आपके सम्मान में हैं। आप दर्शकों का इक़बाल हमेशा बुलंद रहे। आपने मुझे बनाया। आप ने मुझे सहारा दिया। करोड़ों दर्शकों का स्वाभिमान किसी की नौकरी और मजबूरी से काफ़ी बड़ा होता है। मैं आप के प्यार के आगे नतमस्तक हूँ।”

आपल्या वाट्याला आलेली खेळी\सामना समरसून खेळलेल्या एका साहसी पत्रकाराचं हे मनोगत, एका श्रेष्ठ पत्रकाराचं ‘निरोपाचं स्वगत’ कसं असावं, याचा नमुना म्हणूनही आदर्श ठरावं.

ऐका, तर… रवीश कुमार ‘रवीश कुमार’च्याच आवाजात…

.................................................................................................................................................................

रवीश कुमार यांचे यु-ट्युब चॅनेल - ‘Ravish Kumar Official’

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......