आजूबाजूला ‘मेंदू नसलेली कवटी’ आणि ‘बेशरमाची झाडे’ पाहून कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘सालं अतीच झालं!’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 05 November 2022
  • ग्रंथनामा शिफारस सालं अतीच झालं Saala Atich Zaal खेमराज भोयर Khemraj Bhoyar

क्रांती किंवा चळवळ रस्त्यावरचीच असते असे नाही, ती वैचारिकही असू शकते. जगातल्या क्रांत्या वा चळवळींच्या इतिहासात आपण हे पाहिलेलं आहे. ‘फ्रेंच राज्यक्रांती’मध्ये वैचारिक चळवळीची भूमिका व्हॉल्टेअरने मांडली होती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला वैचारिक क्रांतीचा फार मोठा हातभार लागला होता. प्रस्थापितांकडून अन्याय, अत्याचार होताना त्याविषयी जनतेत चीड, राग निर्माण करण्याची भूमिका विचारवंत, समाजसुधारक, साहित्यिक लेखनातून पार पाडतात. हे फक्त भाषणांतून किंवा वैचारिक लेखनातून होते असे नाही, तर ललितसाहित्यातूनही तितक्याच प्रभावीपणे होते. कवी कुसुमाग्रज जेव्हा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ म्हणतात तेव्हा शब्दही गर्जत येतात.

समकाळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, खोटारडेपणा वाढतो आहे, भंकसगिरी बोकाळते आहे, तेव्हा भूमिका ठेवून जगणाऱ्या कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कवी खेमराज भोयर यांची यांचा हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. श्रीधर अंभोरे यांचे समर्पक मुखपृष्ठ लाभलेल्या या कवितासंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी न्यायपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. यासोबत कवी लोकनाथ यशवंत व सागर सरहद्दी यांनी केलेले मलपृष्ठावरील भाष्य कवितासंग्रहाची उंची वाढवणारे आहे.

डॉ.यशवंत मनोहर म्हणतात, “चळवळीतील प्रत्येक मन कवीचेच मन असते. काही मने  कृतींनी बोलतात, तर काही मने कवितांनाच कृतीमय करतात. सार्त्र  म्हणतो त्याप्रमाणे ‘To speak is to act. The writer a free man addressing free men, has only one subject- freedom’. कवी लिहितो ही त्याची कृतीच असते. जग बदलण्यासाठीच तो लिहितो आणि मानवाला स्वतंत्र करणे हाच त्याचा विषय असतो.”

‘कविता हीसुद्धा चळवळीतील एक कृतीच असते’ हा विचार प्रस्तुत कवितासंग्रह वाचताना वारंवार येतो. कवी लोकनाथ यशवंत म्हणतात, “आपण राहतो ती दुनिया फारच लबाड आहे. येशू- बुद्ध- पैगंबर यांच्या आदर्शच्या खूपच लंब्याचवड्या बाता करते आणि युद्धाच्या खुरापतीही सतत उकरून काढते. जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकते नि लाखो माणसांना क्षणात मारून टाकते. अशी दुटप्पी दुनिया बघून कवी अस्वस्थ होतो.” त्यातून कवीचे शब्द शस्त्र म्हणून बाहेर पडतात. ‘ये तो बहुत जादा ही हुवा…’ असे मत सागर सरहद्दी व्यक्त करतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

या कवितासंग्रहात एकूण ९६ कविता आहेत. समकालीन समाजकारण, राजकारण, अर्थकारण, मीडिया यांची दुटप्पी भूमिका पाहून कवी अस्वस्थ होतो. लोकशाहीची क्रुरकर्म पाहून आपणास लाज वाटायला लागते. कोण सत्तेत? कोण विरोधी पक्ष हेच कळत नाही.

“मी सत्ताधारी, तू विरोधी

तू विरोधी, मी सत्ताधारी

पर्यायच नाही दुसरा” (पृ.२३)

आपण नम्रपणे मालकी स्वीकारली आहे. स्वसन्मान, अस्मिता खुंटीला गुंडाळून ठेवली आहे. कारण  ‘तुकडा’ भेटला की, घशाला कोरड पडेपर्यंत बोंबलणारे, बेंबीच्या देठापासून चिडीचूप आहेत. दलालांची फौज वाढलेली आहे. कसायाच्या दावणीला सारे आमचेच चमचे आहेत. रक्ताचा लिलाव करून, त्यांचीच थुंकी चाटत आहेत. सत्काराच्या भिकेला स्वतःची लाज विकली आहे. याची कवीला प्रचंड चीड येते. तो आपल्या लेखणीतून प्रहार करतो. आपल्या समविचारी दोस्तांना बंड करण्यास, क्रांती करण्यासाठी प्रवृत्त करतो-

“काठ फिरून खोलीचा

अंत लागणे नाही इथे

मेंदू नासव्या भक्तीची

ती कोंडी फोड दोस्ता” (पृ.३९)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

गटारातील गटातटांना घोडा लाव, लाथ मारून पाणी नाही तर पेट्रोल काढ असा सल्ला कवी देतो. ‘मला कुठल्याच वादात पडायचं नाही’ म्हणणाऱ्यांना कवी आपल्या बापाची आठवण करून देतो. आपण आपली खरखटी ठेवून त्यांचं धुवायला निघालो, दोस्त कोण? दुश्मन कोण? यावरून आपण भांडत बसलो, याचा राग कवीला येतो. म्हणून तो आपल्या मुलाला बजावून सांगतो- ‘शिक्षणाच्या परीक्षेत नापास झालास, फरक पडत नाही. आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी मात्र तुला महापुरुषांच्या विवेकाचा धागा पकडावा लागेल. कारण आजच्या कृतिशून्य  जगण्याचा कवीला संताप येतो-

“लिहून फार झाले

गाऊन फार झाले

पोकळ धमकी वार

देऊन फार झाले” (पृ.८२)

काठीविना झेंड्याला अर्थ राहत नाही. मोर्च्यात कधी न राहता, चर्चेत सहभागीला किंमत नाही, करणी आणि कथनीत फरक असू नये, ही कवीची प्रांजळ भावना आहे. “तुम्ही बाटलीनं पिता, की बोळ्यानं, या वादात मला पडायचं नाही, गंध बनून लोळायचं नाही, अन् आपसात लढायचं नाही” ही भूमिका हा कवी घेतो.

प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. पण दुर्दैवाने काही बोटांवर मोजता येतील, असे अपवाद वगळले तर बाकी सर्व विकले गेली आहेत. निरर्थक चर्चा, सत्तेची दलाली, ठरवून घेतलेल्या मुलाखती करणाऱ्या मीडियाला कवी प्रश्न करतो-

“माउल्या भोगून कापले-फाडले

पोटातील तिच्या गर्भही गाडले

सांगा कलम कसायांनो आता

आटली का शाई? मेंदू का सडले?” (पृ.६७)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

डोळ्यांदेखत धिंड काढताना, वस्ती जाळताना, धर्माचे ठेकेदार हैदोस घालताना, लोकशाहीआड नंगेशाही चालू असताना तुमची कलम का चालत नाही? असा प्रश्न कवी मीडियाला विचारतो. डुप्लिकेट लोकांचा खूप राग कवीला येतो. फेकू नेत्यांचा राग येतो. तो फक्त राजकारण्यांना, मीडियालाच उघडे पाडतो असे नाही, तर समाजातल्या संधिसाधू लोकांनाही सोडत नाही-

“तो ‘रामराम’

नमस्कार करीत

माझ्याजवळ थांबला

हळूच मला ‘जय भीम’ म्हणाला

अन् माझा हात

पायातील

बुटाकडं लांबला…” (पृ.८७)

ज्या बापाने तुला अस्तित्व दिलं, त्या बापाचं नाव घेताना तुला लाज वाटत असेल तर खबरदार, असा दमही कवी देतो. ‘फुले-शाहू-आंबेडकर-शिवाजी’ यांचा आरसा व आदर्श घेऊन पुढे येण्याचा सल्ला देतो.

थोडक्यात, समकाल भयावह, भीषण शब्दांत व्यक्त करताना कवी शब्द शस्त्र म्हणून घेऊन येतो. ‘बेशरम’, ‘कृतिशून्य’, ‘खेकडे’, ‘फौज’, यांची संख्या वाढते आहे. आजूबाजूला ‘मेंदू नसलेली कवटी’ आणि ‘बेशरमाची झाडे’ पाहून कवीच्या ओठावर सहज शब्द येतात- ‘सालं अतीच झालं!’

‘सालं अतीच झालं!’ - खेमराज भोयर

परिस पब्लिकेशन, पुणे

पाने – १५२

मूल्य – २०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......