द. मा. मिरासदार : कथालेखनामध्ये आणि कथाकथनामध्येही स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आनंदाचे ‘मिरास’दार
संकीर्ण - श्रद्धांजली
विनय हर्डीकर
  • द. मा. मिरासदार
  • Sat , 09 October 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली द. मा. मिरासदार D. M. Mirasdar विनय हर्डीकर Vinay Hardikar

मराठीतील ज्येष्ठ विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचं नुकतंच पुण्यात निधन झालं. त्यांना ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक विनय हर्डीकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून वाहिलेली श्रद्धांजली...

..................................................................................................................................................................

फडके-खांडेकरांची साचेबद्ध कथा, ज्यांच्या नावावर नवकथा जमा आहे ते गंगाधर गाडगीळ-अरविंद गोखले-व्यंकटेश माडगूळकर-पु. भा. भावे हेही लिहीत होते. सदानंद रेगेंसारखे लोक लिहीत होते, जयवंत दळवींसारखे नवीन आलेले लोक लिहीत होते. या सगळ्या गर्दीमध्ये कथालेखनामध्ये आपलं एक स्वतंत्र स्थान द. मा. मिरासदारांनी कसं निर्माण केलं, हा दीर्घ मांडणीचा विषय आहे. परंतु ते त्यांनी निर्माण केलेलं होतं, हे मात्र नक्की.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कथेमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण करणं हे जसं अवघड होतं, तसं कथाकथनामध्येसुद्धा स्वतंत्र स्थान निर्माण करणं अवघडच होतं. एका बाजूला व्यंकटेश माडगूळकर, दुसऱ्या बाजूला शंकर पाटील, तिसऱ्या बाजूला व. पु. काळे आणि अधूनमधून कथाकथन करणारे ग. दि. माडगूळकर, नंतर आलेल्या ज्योत्स्ना देवधर वगैरे स्त्रीलेखिकाही कथाकथनामध्ये पुढे यायल्या लागल्या होत्या. या सगळ्यामध्ये मिरासदारांनी कथा सांगण्याचं एक स्वतंत्र तंत्र निर्माण केलं.

मिरासदार या गर्दीमध्ये वेगळे दिसतात ते कशामुळे? उत्तम लेखकाच्या अंगी असणारे सूक्ष्म निरीक्षण, कथनशैली वगैरे गुण त्यांच्याकडे होते. पण मला असं वाटतं की, मिरासदारांच्या जडणघडणीमध्ये पंढरपूर या गावाचाही फार मोठा वाटा आहे....

..................................................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत.

त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......