अजूनकाही
हार्दिक पटेल यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतरचे कवित्व
‘आलय’ म्हणजे काय तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही जे उत्तर द्याल ते मलाही माहीत आहे, पण खात्री करवून घेऊ म्हणून तुम्हाला विचारले. मला सांगा, ‘आलय’ म्हणजे घर ना? ‘देवालय’ म्हणजे देवाचे घर. आणखी उदाहरण द्यायचे तर ‘सचिवालय’, ‘न्यायालय’, ‘विद्यालय’, ‘रुग्णालय’, ‘औषधालय’ या चांगल्या गोष्टींची घरे जशी असतात, तसे जिथे मद्य मिळते, ते ‘मद्यालय’. म्हणजे वाईट गोष्टींनासुद्धा घर आहे आपल्या भाषेत.......
न्यायमूर्ती आणि लेखक म्हणून जनमाणसातील नानासाहेबांची प्रतिमा खूपच लखलखीत होती. महत्त्वाचं म्हणजे ही प्रतिमा धवल चारित्र्याच्या कोंदणात विराजमान होती. गेली साडेचार दशकं पत्रकारिता करत असताना प्रतिमा लखलखीत असणारे राजकारण आणि साहित्याच्या क्षेत्रातले नागपूर, मुंबई, दिल्लीत असंख्य भेटले; त्यापैकी बहुसंख्य त्याच प्रतिमेच्या कोशात गुरफटून गेलेले पाहण्यात आले.......
मराठी माणसाचा कमी समाधान मानणारा स्वभाव मोठा अडसर आहे. मधु दंडवते, विदर्भातील काही मोठे नेते, यांनी दिल्लीत खूप चांगलं काम केलं होतं, पण नंतर संगीत खुर्चीचा खेळ झाला आणि ते राजकारणातून बाजूला झाले. हीच मराठी माणसांची एक मोठी समस्या आहे. त्यांना मिळालेल्या स्थानावर समाधानी राहण्याची सवय आहे, पण मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही, तर दिल्लीवर मराठी प्रभाव प्रस्थापित करणं कठीणच आहे.......
“आमच्या वीस पिढ्या या मातीत खपल्या. माझा जन्म तर गुजरातमधील दाहोड येथे झाला. मरण्यापूर्वी मी शाहजादा मुहम्मद आझमला पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की, तेथील गावकऱ्यांची दयाळूपणे काळजी घे. प्रधानसेवक मोदींचे जन्मगाव तेथून फक्त साठ मैल दूर आहे. मग मी या मातीतला नाही का? १८५७च्या उठावात तर आमच्या घराण्याने जे होते नव्हते, ते सर्व या मातीला समर्पित केले आणि आम्ही नामशेष झालो. असे असताना मी आक्रमणकारी कसा?” .......
मोहन ज्या घाईत वावरायचा, त्याच घाईत त्यानं एक्झिट घेतली. मोहनचा वावर घाईचा असला, तरी त्याच्या कामात आणि विचार करण्यात विलक्षण ठामपणा होता. आदिवासी आणि त्यांचं जल, जमीन, जंगल याभोवती मोहनचं काम आणि विचार केंद्रित राहिले. मोहन हा कोणतीही परतफेडीची अपेक्षा न बाळगता परिवर्तनाची विधायक लढाई तळमळीनं जगणारा कार्यकर्ता होता. ‘मेंढा लेखा’चा वेगळा प्रयोग यशस्वीपणे राबवूनही मोहननं कधी प्रसिद्धीचीही अपेक्षा बाळगली नाही.......
शिरोजीने आपल्या बखरींमध्ये रंगवलेल्या चर्चानाट्यामधून ‘मोदीकालीन भारत’ आपल्यासमोर अगदी जिवंत होऊन उभा राहतो, हे २१२५मधील आजच्या सर्व वाचकांना मान्य करावेच लागेल, परंतु त्याच वेळी शिरोजीच्या रोजनिशीमधून व्यक्त होणाऱ्या तत्त्वचिंतनामधून ‘मोदीकालीन भारता’चे अंतरंग आपल्या समोर उलगडत जातात, हेसुद्धा आपण नाकारू शकत नाही.......
चार दशकांच्या पत्रकारितेत काही पंतप्रधानांना जवळून, तर काही लांबून पाहता आलं, मात्र सच्चा, साधा, नम्र आणि सुसंस्कृत पंतप्रधान केवळ डॉ. मनमोहनसिंग हेच एकमेव. सुसंस्कृतपणाची साधना त्यांच्याकडे होती. देशाच्या आर्थिक धोरणांचा शिल्पकार, उच्चविद्याविभूषित, आर्थिक विद्वान, सुसंस्कृत म्हणून डॉ.मनमोहनसिंग कायम स्मरणात राहतील. असे उच्च विद्याविभूषित, अर्थतज्ज्ञ, सुसंस्कृत नेते समकालात किती आहेत?.......
लख्ख गोरा वर्ण, सहा फुटाच्या जवळ पोहोचणारी शरीरयष्टी, मस्तपैकी ‘कलावंतीय’ अस्ताव्यस्त डोईवरचे केस, चष्म्याआडचे डोळे उत्सुकतेनं भरलेले, समोरच्याशी बोलताना प्रतिक्रिया म्हणून चेहऱ्यावरचे सतत बदलणारे भाव, ‘मेलोडियस’ म्हणता येईल, अशी वाणी, स्वभाव गप्पिष्ट आणि अत्यंत टीपटाप कपडे. कपड्यांची निवड चोखंदळ... सप्रे यांना मी कधीच चुरगाळल्या-मुरगाळल्या कपड्यांत बघितलंच नाही.......
लोक नेहमी असे विचारतात, प्रेमाच्या विज्ञानाचे एवढे सगळे ज्ञान झालेल्या या फिशरबाईंना प्रेमाने तर नाही बिघडवले? प्रेमाची इंगळी तर नाही त्यांना डसली? त्यावर फिशरबाईंचे उत्तर होते जवळपास नाहीच! तुम्हाला चॉकलेट केकमध्ये कोणकोणते घटक पदार्थ असतात, हे नेमकेपणाने ठाऊक असते, पण जेव्हा तुम्ही तो केक खाता, तेव्हा फक्त मौज असते. आनंद असतो. टिकाऊ प्रेमाची खरी किल्ली, आयुष्यभर प्रणयभावना जपण्यातच असते.......
धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment