चीनने भारताची खोडी का काढली? भारताचं परराष्ट्र धोरण चुकलं का?
पडघम - देशकारण
परिमल माया सुधाकर
  • परिमल माया सुधाकर
  • Thu , 25 June 2020
  • पडघम देशकारण भारत India चीन China परराष्ट्र धोरण Foreign Affairs परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar

गेल्या काही दिवसांपासून चीनने भारताच्या गलवान खोऱ्यात केलेल्या घुसखोरीबद्दल देशात जोरदार चर्चा चालू आहे. प्रसारमाध्यमे त्याविषयी बोलताहेत, सर्वसामान्य भारतीयांच्या भावनाही तीव्र झालेल्या आहेत. ‘चायन बॅन’चा नारे दिले जात आहेत. मात्र केंद्र सरकारकडून पुरेसं आणि नेमकं स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. चीनने भारताचे २० जवान क्रूरपणे मारलेत. काही जवानांना पकडलंही होतं. त्यांची नंतर सुटका करण्यात आली. नेमकी आणि अचूक माहिती ना प्रसारमाध्यमांकडे आणि ना केंद्र सरकारने त्याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. उलट गलवान खोऱ्यात काहीही हालचाली झालेल्या नाहीत, असा खुलासा केल्यामुळे चीनच्या आगळिकीविषयी वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. देशाचे जनमानस नेहमीच परकीय आक्रमणांबाबत आक्रमक असते. पण सीमाप्रश्न वा त्यावरील हालचाली शांतपणे समजून घेणे गरजेचे असते.

या पार्श्वभूमीवर ‘अक्षरनामा’चे लेखक आणि चीनचे एक अभ्यासक परिमल माया सुधाकर यांनी केलेली चर्चा दोन भागात.

..................................................................................................................................................................

पहिला भाग - चीनने भारताची खोडी का काढली? त्यामागे चीनचा नेमका काय हेतू आहे?

दुसरा भाग - भारताचं परराष्ट्र धोरण चुकलं का? त्यामागची नेमकी कारणं काय?

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......