२४ मार्च ते ३१ मे २०२० : लॉकडाउन ते अनलॉक १.० - देश गोठवून टाकणाऱ्या दिवसांची एक व्हिडिओमय झलक
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • ‘उठेंगे हम’ या माहितीपटाचे एक पोस्टर
  • Sat , 13 June 2020
  • पडघम देशकारण उठेंगे हम Uthenge Hum उठेंगे हम We Will Rise भारतबाला Bharatbala करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

२४ मार्च २०२० हा दिवस या वर्षांतला ‘सर्वांत महत्त्वाचा दिवस’ म्हणून गणला जाईल. कदाचित या दशकातला तो ‘सर्वांत महत्त्वाचा दिवस’ही ठरेल. कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. तो नंतर वाढवत वाढवत १ जूनपर्यंत गेला. नक्की सांगता येत नाही, पण भारतीयांचं जगणं बंदिस्त करणारा, त्यांचा वावर कडकोट बंदिस्त करणारा दिवस म्हणूनही त्याचं नाव भावी इतिहासात नोंदलं जाईल.

तसाच ३१ मे २०२० हा दिवसही. या दिवशी रेड झोन वगळता इतर ठिकाणचा लॉकडाउन संपून ‘अनलॉक १.०’ सुरू झाला. (हळूहळू ऑफिसेस, बाजारपेठा, मॉल्स सुरू करण्याला हळूहळू परवानगी मिळतेय. अनलॉकनंतरही करोनाची भीती वर्तवली जातेच आहे. पण तो वेगळा आणि स्वतंत्र विषय आहे.)

या दोन महिने एक आठवड्याच्या कालावधीत आपला देश कसा होता, लॉकडाउन होता म्हणजे नेमका काय होता, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या औरसचौरस, खंडप्राय, मध्यममार्गी, निम्म मध्यमवर्गीय देशाने या सक्तीच्या लॉकडाउनमध्ये कसे दिवस व्यतीत केले, याचा शोध घेतला आहे प्रसिद्ध दिग्दर्शक व फिल्ममेकर भारतबाला आणि त्यांच्या टीमने.

२५ मार्चपासून देशभरात तब्बल ११७ ठिकाणी टीम बांधून त्यांनी ‘उठेंगे हम’ हा चार मिनिटे दहा सेकंदांचा विशेष माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटात १३० कोटी भारतीयांची आणि त्यांच्या भारत या देशाची गोष्ट अगदी थोडक्यात सांगितली आहे.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......