भव्य ग्रंथदिंडी काहीशा बोचऱ्या थंडीत उस्मानाबादकरांसाठी ऊब आणणारी ठरली!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • ग्रंथदिंडीची छायाचित्रे
  • Fri , 10 January 2020
  • पडघम साहित्य संमेलन विशेष फादर फ्रान्सिस दिब्रिटो Father Francis Dibroto अ. भा. मराठी साहित्य संमेलन

आजपासून उस्मानाबाद इथं ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेली भव्य ग्रंथदिंडी उस्मानाबादकरांसाठी काहीशा बोचऱ्या थंडीत ऊब आणणारी ठरली. तब्बल १५ वर्षांनी उस्मानाबादमध्ये सहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचा उत्साह ग्रंथदिंडीमध्ये पाहायला मिळत होता.

उस्मानाबादमधील तेर हे गाव संत गोरोबा यांचं जन्मगाव. त्यामुळे सहित्य संमेलनस्थळाचं 'संत गोरोबाकाका सहित्यनगरी' असं नामकरण केलं आहे.

ग्रंथदिंडीमध्ये संत गोरोबाकाका यांचा पुतळा लक्ष वेधून घेत होता

संत गोरोबाकाका यांच्या पुतळ्यासमोर बाल वारकरी हरिनामाचा गजर करत होते

त्याचबरोबर संत गोरोबाकाका यांच्या नावाची गाडी आणि देखावेही होते

संत गोरोबाकाका याच्या मातीच्या गोळ्यातून मडकी घडवणार्‍या चाकाची हलती प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती

शालेय मुलं आणि मोठे यांचा उत्साह ओसंडत होता

मुली आणि महिला यांची संख्या लक्षणीय होती

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचे अध्यक्ष असल्याने त्यांचं जन्मगाव, वसई इथून आलेले अनेक ख्रिस्ती बांधव ग्रंथदिंडीमध्येही सह्भागी झाले होते

बाबा रामदेव यांनी ग्रंथदिंडीमध्येही आपली जाहिरात करण्याची संधी सोडली नाही. यातून आपण मराठी माणसं कधी बोध घेणार?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 14 January 2020

फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती अचानक का बिघडली या ग्रंथदिंडीच्या वेळेस? हिंदू धर्मग्रंथ डोक्यावर घ्यावे लागतील म्हणून तर नाही?
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......