उद्विग्न होऊन येत्या २१ तारखेला मी मतदान न करण्याचे ठरवले आहे!
पडघम - राज्यकारण
विनय हर्डीकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 15 October 2019
  • पडघम राज्यकारण विनय हर्डीकर Vinay Hardikar नोटा NOTA मतदान Voting विधानसभा निवडणूक Vidhan Sabha Election लोकशाही Democracy

विनय हर्डीकर म्हणतात - 

१) मी याआधी प्रत्येक निवडणुकीत मतदान केलेलं आहे.

२) बहिष्कार ही सुद्धा ‘राजकीय कृती’च आहे, ती माघार नव्हे.

३) ‘NOTA’ला धार नाही.

४) मी सगळ्याच पक्षांबद्दल बोलतोय, कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही. (अपवाद असलाच तर आमचा ‘स्वतंत्र भारत पक्ष’ एवढाच काय तो अपवाद आहे, कारण त्याचा उमेदवारच नाही!) त्यामुळे ‘भाजपची लोकप्रियता तुम्हाला पाहवत नाही’ या आक्षेपाला काहीही अर्थ नाही. 

.............................................................................................................................................

सत्तेची किळसवाणी हाव, निर्लज्जपणे केलेली पक्षांतरे आणि त्या पक्षांतरांचे तितकेच बेमुर्वत, तत्त्वहीन समर्थन, राजकीय प्रचाराची बटबटीत, थिल्लर आणि हीन भाषा आणि शैली, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची चर्चा करणे सोडून मतदारांच्या भावना भडकवण्याचे सत्ताधारी पक्षांचे गारुड आणि त्याला माजी सत्ताधारी पक्षांची बेजबाबदार उत्तरे, आरोप-प्रत्यारोप, सर्वच पक्षांतून गुंड-गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचा आढळ, या आणि इतर कारणांमुळे उद्विग्न होऊन मी मतदान न करण्याचे ठरवले आहे.

भारतीय लोकशाही परिपक्व व्हावी म्हणून मी केलेली धडपड सर्वांना माहीत आहे. मतदान करणे माझे कर्तव्य आहे याची मला जाणीव आहे. तरीही मतदानावर बहिष्कार हा लोकशाही मार्ग मी स्वीकारला आहे. ‘नोटा’चा पर्याय मी ती तरतूद झाल्यापासून वापरला होता; मात्र त्यामध्ये आपण केवळ आपल्या मतदार संघातले उमेदवार नाकारतो; सध्याच्या राजकीय संस्कृतीबद्दलची नाराजी त्यातून व्यक्त होत नाही.

शेतकऱ्यांमधले वैफल्य, सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, आर्थिक व्यवस्थेची मंदावलेली गती, नैसर्गिक आपत्तीमध्ये हतबल होणारे सुस्त प्रशासन, वाढत चाललेली आर्थिक विषमता, बकाल शहरीकरण यांतल्या कशाचीही चर्चा न करता ‘सत्तेवर आल्यावर आम्ही हे प्रश्न सोडवू’ अशा उर्मट आवेशाने मतदारांना वारेमाप आश्वासने दिली जात आहेत. गरिबी संपवण्यासाठी धोरणात्मक रचना न बदलता, तुम्ही गरीब म्हणवून घ्या, सरकार तुम्हाला मदत करेल अशी- स्वाभिमानाने उत्पादन कष्ट करण्याऐवजी लाचारी स्वीकारण्याची- सवय जनतेला लावली जात आहे.

यावर उपाय करायचा असेल तर या कोलाहलापासून थोडे दूर होऊन विचार करण्याची गरज आहे. माझ्याप्रमाणे अनेक नागरिक उद्विग्न आहेतच! त्यांनी आपली भूमिका ठरवावी, कल्पना सुचवाव्यात म्हणजे निवडणुकीनंतर एकत्र बसून विचारविनिमय करून Action Plan बनवता येईल.

.............................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत.

त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Tushar Suryawanshi

Sun , 20 October 2019

मी आपल्या या निर्णया वर सहमत आहे आणि असा निर्णय देशातल्या त्या सर्व नागरिकांनी घ्यायला हवा जे या देशात बदल करू पाहता क्रांती करू पाहता. मला जेव्हा पासून राजकीय घडामोडी बद्दल समजायला लागले आहे तो पर्यंत मी मताधिकार करण्याच्या वयात आलोच होतो परंतु आज त्या वयाची मी पाच वर्षे उलटली तरी अजूनही मताधिकार कार्ड मताधिकार नोंदणी करण्याचं धाडस मी केलेल नाही आणि कदाचित या नंतर ही करणार नाही।


Gamma Pailvan

Wed , 16 October 2019

विनय हरडीकर,

तुमच्या या विधानाशी सहमत :

यावर उपाय करायचा असेल तर या कोलाहलापासून थोडे दूर होऊन विचार करण्याची गरज आहे.


पण मग यासाठी मतदानावर बहिष्कार कशास्तव ? जो काही विचार करायचाय तो मतदान करूनही करता येतो ना ? मोदीपक्ष भरघोस मतांनी निवडून येतो हे शल्य तर मनी नाही तुमच्या ? थेट बहिष्काराची भाषा शोभंत नाही तुम्हांस ! शेवटी काही झालं तरी मतदान हे लोकशाहीतलं पवित्र कर्तव्य आहे, नाहीका ?

आपला नम्र,
गामा पैलवान


Bhagyashree Bhagwat

Tue , 15 October 2019

संपूर्ण सहमत


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......