हे लेख सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत ह्या दोन्हींच्यामध्ये आंदोलित होणाऱ्या मनासाठी आहेत!
ग्रंथनामा - झलक
गणेश देवी
  • ‘त्रिज्या’या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 14 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक त्रिज्या Trijya गणेश देवी Ganesh Devi

डॉ. गणेश देवी यांचं ‘त्रिज्या’ हे छोटेखानी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेलं हे मनोगत...

.............................................................................................................................................

या छोट्याशा पुस्तकात मराठी वाचकांसमोर माझ्या मनात गेले अनेक वर्षे पिंगा घालणारे काही प्रमुख विचार मांडले आहेत. पुस्तकात प्रस्तुत केलेल्या लिखाणास ‘लेख’ हे सन्माननीय नाव देणे योग्य नाही. लेखांना स्वत:ची काही शिस्त असते. त्यामागे काही संकल्पना-संदर्भ असतो. तो या लेखनाच्या मागे नाही. त्यातील काही, मी स्वत:पुरता विचार करत असताना केलेल्या त्रोटक नोंदी आहेत. काही फक्त विचारांचे पुसटसे धागे आहेत. काही जाहीर व्याख्यानात उच्चारलेले तात्पुरते विचार आहेत. पण जे आहे, ते सगळे एका विस्तृत विचारपटलावरचा सुस्पष्ट नकाशा आहे. हा नकाशा थोडासा, मध्ययुगातील खलाशांनी बनवलेल्या दर्याच्या नकाशासारखा. भूगोलाच्या अभ्यासकांना मान्य होणार नाही, तरीही त्या दर्यावर्दी भटक्यांना पूर्ण मार्गदर्शन करू शकेल असा. म्हणून, या पुस्तकात जे आहे त्याला मी थोड्याफार संकोचाने ‘वैचारिक लेख’ म्हणू इच्छितो. त्यातल्या कल्पना, संकल्पना माझ्यापुरता थोडाफार प्रकाश देत आल्या आहेत. तो प्रकाश तशाच प्रकारे वाचकास मिळेल हा माझा दावा नाही. किंबहुना दावे करणे वगैरेला मी कंटाळून गेलो आहे.

मला फक्त जाता जाता, जमेल तितके, जे मूल्यवान वाटते ते नमूद करावेसे वाटले. म्हणून हे सारे. हे लेख सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नाहीत. ते विचारवंतांसाठीपण नाहीत. पण ह्या दोन्हींच्यामध्ये आंदोलित होणाऱ्या मनासाठी आहेत.

या लेखांच्यामध्ये काही तुटक्या ओळी आहेत, त्या कविता नाहीत. ते फक्त विचार आहेत. काही सरळ आहेत. स्पष्ट आहेत. काही अस्पष्ट आहेत. त्या तुटक्या ओळीत वाचकांनी स्वत:चे विचार, कृती आणि आवाज मिळवून त्या कविता पूर्ण करायच्या आहेत. अर्थात, ही अपेक्षा जरा जबरदस्तीची आहे, पण जाता जाता, आणि कदाचित परतणे शक्य होणार नाही म्हणून तीही करतो.

जो केंद्र नाही आणि जो परीघ नाही, असा हा मधलाच लटकलेला आवाज, खूप अस्पष्ट, क्षीण, तुमच्यापर्यंत पोचवला आहे. तो सांभाळला जावा.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......