टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शशी थरुर, सुब्रह्मण्यम स्वामी, रेड्डी कन्येचा शाही विवाह आणि पतंजली उत्पादने
  • Sat , 19 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पतंजली Patanjali शशी थरुर Shashi Tharoor सुब्रह्मण्यम स्वामी Subramanian Swamy

१. नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच अर्थ खात्याने आपत्कालीन नियोजन करून ठेवायला हवं होतं. तसं केलं असतं, तर लोकांना त्रास सहन करावा लागला नसता : डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

सुब्रह्मण्यम स्वामी हे एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही पंचाईत करतात, हे त्यांचं अदभुत सामर्थ्य आहे. आता स्वामी हुशार आहेत, बरोबरच बोलतात, असं सत्ताधारी किंवा भक्तगण म्हणू शकत नाहीत आणि ते तर निव्वळ वाचाळशिरोमणी आहेत, असं विरोधक किंवा अभक्तगण म्हणू शकत नाहीत.

...............

२. हजारो कोटींचे कर्ज थकवणाऱ्या धनाढ्य कर्जदारांनी वेळोवेळी परतफेड केली असती या देशाची अर्थव्यवस्था कोसळली नसतीच. पण त्यासोबतच हा नोटबंदीचा निर्णय घ्यावा लागला नसता : शिवसेना

व्हिडिओकॉनने पक्षाला ८५ कोटी रुपयांची देणगी दिल्याची बातमी नेमकी याच दिवशी यावी, एवढा एक विलक्षण योगायोग सोडला, तर बाकी सगळं बरोबर आहे. आता निदान या कर्जबुडव्यांकडून मुखपत्राच्या मुखपृष्ठावरच्या जाहिरातींसाठी वार्षिक करार तरी करून घ्या घसघशीत. जनतेपर्यंत ज्वलंत विचार तरी पोहोचत राहतील व्यवस्थित.

...............

३. उदारमतवादी इतिहासकारांचं मत काहीही असलं, तरी ब्रिटिश राजवट अन्यायकारकच होती. कॅनडाच्या पंतप्रधानांनी २०१६च्या सुरुवातीला तिथल्या शिखांची जाहीर माफी मागितली. ब्रिटिश पंतप्रधानांनीही जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत संपूर्ण भारताची जाहीर माफी मागायला हवी : डॉ. शशी थरूर

त्यानंतर लगेचच १९८४च्या दंगली आणि शीख हत्याकांडासंदर्भात, देशातल्या ६० वर्षांच्या दिशाहीन, भोंगळ कारभाराबद्दल, साफ चुकलेल्या निर्णयांबद्दल काँग्रेस पक्षही माफी मागेल देशाची, हो ना थरूरसाहेब?

...............

४. रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहात शुद्ध देशी गाईंची निर्मिती करण्यासाठी विदेशात नव्याने वापरलं जाणारं भ्रूण प्रत्यारोपणाचं (एम्ब्रिओ ट्रान्स्फर) तंत्र आता वापरलं जाणार. त्यामुळे भारतीय गोवंशाच्या आनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती होऊन ग्राहकांना चांगल्या प्रतीचं दूध मिळणार.

देवा देवा देवा, केवढा हा अनाचार? देशी गाईंचा वंश सुधारण्यासाठी विदेशी तंत्राचा वापर? आपल्या देशात हजारो वर्षांपासून प्लास्टिक सर्जरीचं (तीही हत्तीचं मुख मानवी धडावर बसवणारी) तंत्र विकसित झालेलं असताना, पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिलेला असताना साक्षात देशी गोमातेसाठी विदेशी तंत्रज्ञान? दुधाबिधाचं जाऊद्याहो, ते नसलं तरी चालतं… आपले ३३ कोटी देव राहतील ना सुखरूप या नव्या देशी गायींच्या पोटात? गोठ्यात आणताना गोमूत्र शिंपडून त्यांना शुद्ध करून घेत चला, बरं का!

...............

५. कर्नाटकमधील खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या शाही विवाहसोहळ्यावर पाचशे कोटींचा खर्च; सर्व खर्च चेकनं केल्याचा रेड्डींचा दावा.

भर मांडवात नाट्यमय पद्धतीने आर्थिक विभागांचे अधिकारी काही कारवाई करतील, अशी अपेक्षा असताना खुद्द शुचितासम्राट येड्युरप्पा यांनी दोन वेळा हजेरी लावल्यामुळे लग्नकार्य पवित्र करून घेण्यात आलेलं आहे, हे स्पष्टच आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मंदीचं सावट पसरलेलं असताना लग्नाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला रोखविहीन चालना दिल्याबद्दल रेड्डी बंधूंचा जाहीर सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक पक्षात परत आणलं पाहिजे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......