टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ‘कोल्ड प्ले’चं पोस्टर, गाय आणि राजनाथ सिंह
  • Wed , 09 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. पत्नी सकाळी उशिरा उठून पतीकडे चहा मागत असेल, तर ती केवळ आळशी आहे, ते काही क्रौर्य ठरत नाही. त्या आधारावर घटस्फोट मिळणार नाही : दिल्ली उच्च न्यायालयाची टिपणी

- मुळात पत्नी सकाळी इतकी उशिरा उठणार असेल आणि पतीला ती जागी होण्याआधी सकाळचे दोन-तीन तास तिचं बोलणं ऐकावं लागणार नसेल, तर पतीने चहाबरोबर ब्रेकफास्टही द्यायला हवा आपणहून. घटस्फोट कसला मागतो इतक्या गुणी पत्नीकडून!

...

२. माणसाचे आणि गायीचे जीन्स ८० टक्के सारखे, त्यामुळे गाय पवित्र : राजनाथ

- माणसासारख्या जीन्सचं प्रमाण गायीपेक्षा चिम्पांझी आणि मांजर यांच्यात जास्त आहे. माणूस आणि केळे यांच्यातही ५० टक्के जीन्स सारखे असतात, ही सगळी वैज्ञानिक माहिती छद्मविज्ञानप्रवर्तक राजनाथांना माहिती असणं शक्य नाही. पण, गाय आणि काही माणसं यांच्यातलं समान जीन्सचं प्रमाण जवळपास शंभर टक्के असावं, अशी शंका काही गोपुत्र आणि गोरक्षकांना पाहिल्यावर येते.

...

३. गरिबी निर्मूलन आणि युवकांमध्ये सामाजिक जाणीवेच्या जागृतीसाठी आयोजित केलेल्या आणि राज्य सरकारने सवलतीचा वर्षाव केलेल्या ‘कोल्ड प्ले’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमस्थळी दारूविक्रीची परवानगी मागण्यात आल्याने गदारोळ.

- यात गदारोळ करण्यासारखं काय आहे? ‘कोल्ड प्ले’चा वाद्यवृंद ऐकण्यासाठी जे कोणी तरुण येतील, त्यांच्यात गरिबी निर्मूलनाचा आणि सामाजिक जाणीवेचा जोश उत्पन्न व्हावा असं विरोधकांना वाटत नाही का? दारू न पिता हा जोश निर्माण होऊ शकला असता, तर ही उद्दिष्टं साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ कशाला आली असती.

...

४. सामाजिक विज्ञानाच्या संदर्भात जगभरातल्या ख्यातनाम नियतकालिकांमध्ये २००९ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या १६ लाख ६० हजार लेखांमध्ये भारताचा वाटा अवघा १.६ टक्क्यांचा.

- काय सांगताय? फेसबुकवरच्या समाजप्रबोधनाच्या पोष्टी काउंट करत नाहीत की काय अभ्यासपूर्ण सामाजिक लेखनात? मग बरोबर. त्या मोजा, मग भारतीयांचा वाटा २००० टक्क्यांच्या आसपास निघेल.

...

५. उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता द्या, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सगळी थकबाकी सहा महिन्यांत माफ करू : राजनाथ सिंह

- अहो, थांबा थांबा काका, आधीच प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या १५-१५ लाखांचं काय करायचं, हेच ठरलेलं नाही. त्यात तुम्ही थकबाकीही माफ करणार. एवढे पैसे खर्च तरी कसे करणार बिचारे शेतकरी! शिवाय एखाद्याला हर्षवायू होऊन प्राणावर बेतलं तर.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......