उन्मादाच्या विरोधात एक कविता
पडघम - साहित्यिक
प्रयाग शुक्ल
  • हिंदीतील मान्यवर कवी, कथाकार, समीक्षक प्रयाग शुक्ल आणि ‘काव्यपर्व’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Thu , 07 September 2017
  • पडघम साहित्यिक प्रयाग शुक्ल Prayag Shukla निरंजन उजगरे Niranjan Ujagare काव्यपर्व Kavyaparva

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घृण हत्येनंतर सोशल मीडियावर जो उन्माद कालपासून उधाणला आहे, त्या उन्मादाच्या विरोधात ही कविता आहे. उन्माद हा नदीच्या पुरासारखा असतो. तो फार काळ टिकत नाही. टिकूच शकत नाही. एका निर्भिड पत्रकाराच्या हत्येचं निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांच्या उन्मादाचंही तसंच होईल. नक्की होईल. तो आशावाद बुलंद करणारी ही कविता आहे... उन्मादाच्या विरोधातली...

.............................................................................................................................................

उन्माद फार काळ टिकत नाही,

हेच लक्षण असतं उन्मादाचं,

बीजांना, झाडांना, पानांना उन्माद नसतो.

असतो वावटळीला-

पण तीसुद्धा फार काळ टिकत नाही.

जेव्हा आपण उन्मादात असतो

तेव्हा पाहू शकत नाही फुलांचे रंग,

ते असतात तसे.

नदीचा उन्माद ओसरून जातो –

पण तो, जो पाहतो

त्याला उन्माद होत नाही.

तसा समुद्राला उन्माद असतो

पण तो नेहमीच उन्मादात नसतो

सूर्य आणि चंद्राला नसतो उन्माद

असतं ते ग्रहण.

जे उन्मादात असतील,

त्याला समजू शकणार नाहीत ह्या ओळी,

प्रतीक्षेत राहील ही कविता

हा उन्माद ओसरून जाण्याच्या.

(‘काव्यपर्व’ या निरंजन उजगरे यांनी संपादित व अनुवादित केलेल्या आणि मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या संग्रहातून साभार)

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ravi

Wed , 13 September 2017

मस्त सर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......