टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ट्रम्प पितापुत्र, केअर वर्ल्ड, तटकरे काका-पुतणे, अमित शहा आणि न्यूज टाइम आसाम
  • Mon , 07 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. एनडीटीव्ही इंडियाबरोबर आणखी दोन वाहिन्यांवर एकेक दिवसाची बंदी

अहाहा, केवढा हा निष्पक्षपातीपणा! पण जो बूँद से गयी, वो हौद से नहीं आती आणि एका बंदीने दुसरी बंदी समर्थनीय ठरत नाही. दुसरी एखादी ट्रिक शोधा राव!

......................................

२. काका सुनील तटकरे यांच्यावर नाराज पुतणे संदीप तटकरे यांचा शिवसेनेत प्रवेश

हिंदी फिल्मी डायलॉगच मारायचा, तर ‘जो सगे भतीजे के नहीं हो सके वो किसी और के भतीजे के क्या होंगे?’ अहो संदीपभौ, तुमचा पत्ता चुकला काय? नाराज पुतण्या पक्ष तर वेगळाच आहे.

......................................

३. दिल्लीला प्रदूषणाचा भयंकर विळखा, शाळांना तीन दिवसांची सुटी, कारखान्यांवरही पाच दिवसांची उत्पादनबंदी

त्यापेक्षा राजधानीतल्या सर्वपक्षीय राजकारण्यांना सक्तीने आपापल्या गावी पाठवून दिलं, तर वैचारिक, भावनिक, बौद्धिक आणि ध्वनिप्रदूषणात प्रचंड घट होईल आणि प्रदूषित पर्यावरणातही दिल्लीकरांचं जगणं अधिक सुसह्य होईल, नाही का?

...................................

४. उत्तर प्रदेशाच्या मतदारांनो, सपा आणि बसपला खूप संधी दिलीत, आता भाजपला द्या. भाजपमध्ये गुंड नाहीत : अमित शाह

किमान हे भाषण करायला तरी वेगळ्या कुणाला पाठवायचं होतं राव. आता सगळे फ्यॅ करून हसत असतील पोट धरधरून वेडपटासारखे!

......................................

५. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक याची फ्लोरिडामध्ये मंदिराला भेट, आरतीत सहभाग, भारतीयांची मतं वडलांकडे वळवण्याची धडपड

इतकी काही धडपड करायची गरज नाही एरिकभाऊ, आमच्या अनिवासी बांधवांनाही तोंडाळ, आक्रस्ताळे, द्वेष पसरवणारे नेते फार्फार आवडतात. तुम्ही फक्त रवीशला ‘रबिश’, सेक्युलरला ‘फेक्युलर’, लिबरलला ‘लिबटार्ड’, पुरोगामीला ‘फुरोगामी’, विचारवंतला ‘विचारजंत’ म्हणायला शिका. आमच्या मतांचा पाऊस पडेल तुमच्या पिताश्रींवर.

.........................

६. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी भारत-चीन यांच्यात देवाणघेवाण करण्याचा राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा बैठकीत निर्णय

पाकिस्तानबरोबर लष्करी सराव आणि भारताबरोबर नुसतेच ठराव? बहुत नाइन्साफी है...

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......