अजूनकाही
हा नाट्यप्रयोग केवळ प्रासंगिक नाही, तर आपल्या काळाचा दस्तऐवज आहे. जोपर्यंत व्यवस्था लक्ष्मीचा वापर करत राहील, तोपर्यंत हा प्रश्न जिवंत राहणार. जोपर्यंत हा प्रश्न जिवंत आहे, तोपर्यंत हे नाटक आवश्यक आहे. आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं हे नाटक अर्थपूर्ण आहे. लक्ष्मीचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तिरेखेचा नाही, तर आपल्या समाजव्यवस्थेचा आहे...
व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’...
‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील...
आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे...
बाबांचा खरा लढा म. फुल्यांच्या स्त्री शूद्रातिशूद्रांसाठी होता. त्यांच्या जीवनात समग्र परिवर्तन घडवण्यासाठी होता. हेच बाबांचे समाजवादी समाजरचनेचे स्वप्न होते. त्या अर्थाने ते समाजवादी होते आणि ते सत्यशोधकही होते. लोकशाही समाजवादाला अभिप्रेत असणारा संघर्ष ते आयुष्यभर करत राहिले. हा संघर्ष करीत असताना कुटुंबाची जबाबदारी शीलाकाकींच्या समर्थ खांद्यांवर सोपवून तुरुंगाच्या वाऱ्या करत राहिले...
एआय समिट’ खरोखर भारताच्या तांत्रिक प्रगतीसाठी होता की, तो केवळ राजकीय इमेज-मेकओव्हरचा भाग होता? जागतिक स्तरावर ‘इप्स्टीन फाईल’मधून सरकारची होत असलेली नाचक्की व विविध वाद, यूएस ट्रेड डीलमधील तणाव, आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये निर्माण झालेली प्रतिमा आणि त्यातून होत असलेल्या इमेज डॅमेजला कंट्रोल करण्यासाठी हा भव्य एआय इव्हेंट आयोजित केला गेला नव्हता ना, अशी शंका आता अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे...
क्रूड तेल हा आधुनिक जगात केवळ ऊर्जा स्रोत नाही; तर तो सत्ता, अर्थव्यवस्था, युद्ध, आणि राजनैतिक दबाव यांचा केंद्रबिंदू आहे. रशियन तेलावर निर्बंध घालण्याचा पश्चिमी देशांचा प्रयत्न हा युद्धाच्या रणांगणात नव्हे, तर आर्थिक रणांगणात चाललेला संघर्ष आहे. भारतासारख्या देशांसाठी या संघर्षात नैतिक भूमिका घ्यायची की राष्ट्रीय हिताची हा प्रश्न कळीचा ठरतो...
सरदार पटेल जरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते आणि पर्यायाने अंतरिम सरकारचे प्रमुख बनले असते, तरी तेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते, असे मानण्याला कोणताही ठोस आधार नाही. म्हणूनच पटेलांना डावलून नेहरूंना अध्यक्ष केले, याचा अर्थ ‘नेहरूंनी पंतप्रधानपद चोरले’ असा होत नाही. देशाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे म्हणून गांधींनी सबळ कारणांनिशी नेहरूंच्या पारड्यात आपले वजन टाकले...
सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं...
गो. मा. पवार यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे वाङ्मयाचा वस्तुनिष्ठ व सुस्पष्ट असा विचार. वाङ्मयाविषयी त्यांची मते निर्भीड असतात. त्यांनी प्रस्थापित लेखकांच्या साहित्याच्या मर्यादा साधार नोंदवल्या आहेत. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर व श्री. ना. पेंडसे यांच्या वाङ्मयातील परंपराशरणता, ऐतिहासिकतेचा अपलाप, स्वप्नरंजनपरतेचा घेतलेला परामर्श मार्मिक आहे...
जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो...
या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच...
सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते...
मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा अजित पवार यांनी कधीच लपवून ठेवली नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं संयुक्त सरकार येण्याआधीच त्यांनी त्यांचं स्थान शरद पवार यांच्या खालोखाल आहे, हे स्पष्ट करून टाकलेलं होतं. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर ते स्थान त्यांनी पहिल्या बारा-पंधरा वर्षांत चांगलं बळकट केलेलं होतं. स्वत:चं रांगडं नेतृत्व प्रस्थापित व्हायला मुंबईबाहेरच वाव आहे, हे ते चांगलं जाणून होते...
एका सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखाला त्याच्या देशात अटक करून घेऊन जाणे, हा प्रकार आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय नैतिकता आणि ‘युनो’च्या सनदेला हरताळ फासणारा आहे. यातून युनोचे अपयश, आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन, बहुध्रुवीकरणाला दिलेली बगल, चीन, रशिया, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांनी उभ्या केलेल्या नव्या चळवळीसमोर आव्हान आणि अमेरिकेची दादागिरी अधोरेखित होताना दिसते...
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.