अजूनकाही
परिणामी आशाला त्याच कॅफेत उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागते. तिथं तिला मध्यमवयीन मॅक एका वेगळ्या प्रकारे भेटतो. म्हणजे तो बसल्या बसल्या खुर्चीवर मेलेला असतो. अचानक त्याचा मोबाईल वाजतो. तो उचलत नाही म्हटल्यावर आशा फोन उचलते. इथून नाटक गती घेतं. आशाला काही वेळानंतर समजतं की, तो मेलेला आहे आणि तिच्याजवळ त्याचा फोन आहे. हा फोन अनेकदा वाजतो. यातून वेगळ्या प्रकारचं नाटक निर्माण होतं....
ही कादंबरी वेगळी वाटली, बेहद्द आवडली. याचं कारण हे आकर्षण केवळ बाह्य नाही, तर कादंबरीलेखनाची ती ताकद आहे, हे ‘पीळ’ वाचून संपवल्यावर जाणवलं. अशात मराठी साहित्यात सतीश नाईक, पंकज भोसले, डॉ. राजेंद्र मलोसे अशा काहींचं काहीवेगळ्या विषयावरचं लेखन वाचायला मिळत आहे. त्या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या मालिकेत बसणारी ‘पीळ’ ही कादंबरी आहे...
हे पुस्तक म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्ष जगण्याच्या पातळीवर कसे आणता येते व त्यातून व्यापक मानवी मूल्य समाज पातळीवर व्यावहारिकपणे कसे आणता येऊ शकते याचे उदाहरण आहे. वाचकाला समृद्ध करणारी ही वैचारिक कलाकृती आहे. हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते एका न्यायमूर्तींच्या लेखणीतून उमटलेले ‘समतेचे गाणे’ आहे. ज्यांना समाज बदलण्याची उर्मी आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक दीपस्तंभासारखे कार्य करेल...
मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु...
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मुलाखती-प्रवचनं ऐकून, त्यांच्या पुस्तकांच्या वाचनामुळे माणसाला जटील प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत व्हायची. सुखाचा, आनंदाचा, दुःखाचा अर्थ कळायला लागायचा, माणुसकीची, चांगुलपणाची महत्ता लक्षात यायला मदत व्हायची. इतकंच नाही तर त्या चांगुलपणाचा, माणुसकीचा, सहानुकंपेचा झेंडा खांद्यावर घेणारा नवा माणूस त्यांच्या प्रेरणेमुळे तयार व्हायचा!...
हे म्हणजे ‘धिंड’ कथेतील दारूड्याची धिंड काढण्यासारखे आहे. एखाद्या गावात दारू पिऊन फिरणारा पकडायचा, दारू विक्रेता, दारू निर्माता, त्याला निर्मितीची परवानगी देणारा, त्याला कच्चा माल पुरवणारा यांना मात्र कधीच जनतेसमोर आणायचे नाही. फक्त जो समोर दिसतो, त्याचीच ‘धिंड’ काढायची. यातून आपल्या शिक्षण व्यवस्थेचेच धिंडवडे निघत आहेत...
‘अनकही’ एक दर्जेदार नाटक आहे, यात शंका नाही. उच्च दर्जाचं दिग्दर्शन आणि त्याला साजेसा अभिनय असला तर रंगमंचावर जादुई परिणाम गाठता येतो. काही अभ्यासकांच्या मते रंगमंचावर ‘भीती’ ही भावना दाखवणं तसं अवघड असतं. ही भावना ‘सिनेमा’ या माध्यमात फार प्रभावीपणे सादर करता येते. अशा सुविधा रंगमंचावर नसतात. ‘अनकही’ने या मर्यादांवर मात केली आहे...
आत-बाहेरच्या पर्यावरणात एकमेळ होता. ‘इको सिस्टिम’ संवादी होती. परस्परावलंबन समंजस होतं. रोखलेल्या कॅमेऱ्यात टिपण्यापलीकडचं... निसर्गाची ही प्राचीन ‘टेपेस्ट्री’ आरपार बदलण्याचा हव्यास घाट आता रोज घातला जातोय. ज्ञान-विज्ञानाच्या सगळ्या शक्यता आजमावत. संवेदनाहीन तंत्रज्ञानाला होकार भरत. नेमक्या कुठल्या सुखासाठी? नेमकं कुणाच्या हितासाठी? या अवघड प्रश्नांची उत्तरं तर त्याहून अवघड...
एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते...
आपल्या प्रिय माणसाला निरोप सावकाशच देता येतो. निरोप देता देताच आठवणींचा दिवा उजळतो. त्या उजेडात समजतं ‘तिने माझ्यामध्ये तिला स्वतःलाच जन्म दिला होता कदाचित. म्हणून एवढी माया केली... ’ उजळलेल्या वाटेवर सम्यक भाव तिच्या मनाला सहज उभारी देतात. लेखिका ‘दिवसातल्या प्रत्येक तासाचा, मिनिटाचा एकेक टाका घालत… देखणी, अगदी घट्ट गोधडी शिवताना दोऱ्याला गाठ मारायची विसरत’ नाही! ...
धार्मिक भावना असणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण काहीसे कमी असते, पण धार्मिक नशेमध्ये बुडालेले ते एकप्रकारचे मनोरुग्ण असतात. जेव्हा श्रद्धा कार्यकारण संबंध नाकारू लागते, वैज्ञानिक उपचारांना विरोध करते, आणि भ्रामक आशेच्या नादी लावून माणसाची फसवणूक करते, तेव्हा ती अंधश्रद्धा बनते. त्यामुळे जी जी श्रद्धा चिकित्सेला नकार देते, ती प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते...
व्यक्तीने परंपरेला प्रश्न विचारून तत्त्वज्ञान घडवायचे, त्या तत्त्वज्ञानाचा पाया वापरून जीवन चांगले, सुंदर आणि न्याय्य बनवायचे, वेळ पडली तर धर्माला आणि परंपरेला प्रश्न विचारून त्यांच्यात बदल घडवून आणायचे, आणि या सगळ्या प्रकारात कायद्याने अन्याय्य शिक्षा जरी केली, तरी ती परंपरेचा, कायद्याचा, पूर्वजांचा आणि समाजाचा आदर म्हणून भोगायची, अशी ही संगती सॉक्रेटिसने आपल्याला लावून दिली आहे...
उपलब्ध ऐतिहासिक पुरावे आणि विविध स्रोतांचा तुलनात्मक विचार केला असता टिपू सुलतानची प्रतिमा एकरेषीय स्वरूपात मांडणे कठीण ठरते. काही प्रसंगी त्याने बंडखोर प्रदेशांमध्ये गैरइस्लामिक लोकांच्या विरुद्ध कठोर उपाययोजना केल्या, तर दुसरीकडे आपल्या राज्यातील हिंदू धार्मिक संस्थांशी सलोख्याचे संबंध राखले. आपल्या प्रशासनातसुद्धा हिंदूंना महत्त्वाचे स्थान दिले...
आपण एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे युद्धाचे पारडे पूर्णपणे इराणच्या बाजूने झुकले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इराणने दाखवलेला समजूतदारपणा, स्वाभिमानाने दाखवलेला ताठरपणा आणि अमेरिका-इस्राईलच्या आक्रमणाला जशाला तसे उत्तर देण्याची सिद्ध केलेली क्षमता. या युद्धातील धोरण व डावपेच, लष्करी प्रयत्न या सगळ्या बाबतीत इराण अमेरिका-इस्राईलला पुरून उरला आहे...
हे तर उघडच आहे की, लोकसभेची सदस्यसंख्या वाढवणारी कोणतीही मतदारसंघ पुनर्रचना केवळ अंकगणितीयच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही न्याय्य असली पाहिजे. कुटुंब नियोजनात अग्रेसर असलेली राज्ये आणि लहान राज्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रमाणानुसार किंवा सापेक्षतः तोट्यात टाकता कामा नये. प्रमाणानुसार वाढ झाल्यास, वास्तविक पाहता सापेक्ष प्रभाव कमी होऊ शकतो, कारण एकूण संख्येतील फरक अधिक मोठा होतो ...
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.