पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काय करावे? : तीन मोठे सैनिकी अधिकारी आणि दोन संरक्षणतज्ज्ञ यांच्या दृष्टीकोनातून...
पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचा प्रश्न तयार झाला आहे. एक स्ट्राँग नेता म्हणून मोदीजींनी आपली प्रतिमा तयार केलेली आहे. आपण सत्तेवर आलो, तर एकसुद्धा हल्ला होणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. या पार्श्वभूमीवर उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगाम असे हल्ले झालेले आहेत. उरी आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईक्स केले, तरी पहलगाम हल्ला झालाच. आता काहीतरी निर्णायक करायचा दबाब त्यांच्यावर आहे...