श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या साहित्याचे दर्शन कालदर्शिकेच्या माध्यमातून
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
निवड व संपादन – हिमांशू स्मार्त
  • कालदर्शिकेचे श्रावण महिन्याचे पान
  • Fri , 28 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक ‌Book of the Week श्रीनिवास विनायक कुलकर्णी हिमांशू स्मार्त

श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतील एक सर्वोत्तम ललितलेखक. त्यांची ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ ही चार ललितलेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही चारही पुस्तके मराठी ललितलेखनातील मानदंड मानली जातात. अतिशय तरल, आशयघन आणि चित्रमय शैली ही कुलकर्णी यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या लेखनाचा हा आविष्कार कालदर्शिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे नाटककार-ललितलेखक हिमांशू स्मार्त आणि प्रकाशक राहुल कुलकर्णी यांनी.

मराठीमधला हा एकमेवाद्वितीय म्हणावा असा प्रयोग आहे.

ही कालदर्शिका ११ एप्रिल २०१३ (गुढीपाडवा) रोजी प्रकाशित करण्यात आली. मात्र ही दिनदर्शिका नसून कालदर्शिका आहे. त्यामुळे ती तुमच्या लेखनाच्या, कामाच्या टेबलवर, ग्रंथसंग्रहात, कपाटात असायलाच हवी अशी आहे.

या कालदर्शिकेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे बारा मराठी महिने आहेत. या प्रत्येक महिन्याला साजेसा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या साहित्यातील एक उतारा हिमांशू स्मार्त यांनी निवडला आहे. त्या महिन्याला साजेसे असे अतिशय सुंदर पेंटिंग रिचा वोरा या चित्रकर्तीने केली आहे. सोबत दिलेल्या छायाचित्रांमधून तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पानाची किती सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे याची कल्पना येईलच. आणि या सर्वांची अतिशय कल्पक कालदर्शिकेची निर्मिती रावा प्रकाशन, कोल्हापूरच्या राहुल कुलकर्णी यांनी केली आहे. याशिवाय कालदर्शिकेत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या ऋतूंचाही उल्लेख आहे.

तर अशी ही कालातीत साहित्य, चित्र, मराठी महिने आणि मराठी ऋतु यांचा अतिशय सुंदर मिलाफ असलेली कालदर्शिका प्रत्येक साहित्यप्रेमीच्या संग्रही असायलाच हवी.

या कालदर्शिकेची ही एक झलक

या सुरुवातीच्या परिचयपर दोन पानानंतर कालदर्शिका सुरू होते

चैत्र

वैशाख

ज्येष्ठ

आषाढ

श्रावण

भाद्रपद

अश्विन

कार्तिक

मार्गशीर्ष

पौष

माघ

फाल्गुन

आणि हे कालदर्शिकेचे शेवटचे पान

.............................................................................................................................................

अशी ही संग्राह्य कालदर्शिका केवळ ५० रुपयांना उपलब्ध आहे.

या कालदर्शिकेच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3748

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......